एके दिवशी आपल्या लक्षात येतं कि पगाराचा बराच भाग हा EMI मधेच खर्च होतोय. आपण स्वतःसाठी नाहीतर बँकेसाठीच कष्ट करतोय याचा आपल्याला साक्षात्कार होतो. आपण जे कर्ज घेतले आहेत, ते खरंच योग्य होते का असा विचार मनात येतो. त्याच बरोबर, जास्तीत जास्त पगाराच्या किती टक्के भाग EMI साठी खर्च करावा हा बेसिक प्रश्न आपल्या मनात येतो. पण या प्रश्नाचा विचार कर्ज घेण्याच्या आधी करणं गरजेचं आहे. यासाठी काही थम्ब रुल आहे का, ते जाणून घेऊया.
बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणजेच NBFC कर्जावरील व्याज वसूल करण्यासाठी अनैतिक हातखंडे वापरत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आलंय. त्यामुळे आरबीआयनं कर्ज वितरणात पादर्शकता आणा, व्याजदरासोबतच इतर शुल्काची समिक्षा करा,असे निर्देश दिलेत. तसेच आता बँकांना कर्जाचा हप्ता चुकल्यास विलंब शुल्काशिवाय इतर शुल्क आकारता येणार नाहीत.
प्रत्येकाने उत्पन्नाच्या किमान 20% रक्कम दीर्घकालाईन गुंतवणुकीसाठी वापरली पाहिजे, त्याच बरोबर ही गुंतवणूक लवकर चालू आवश्यक आहे. लवकर गुंतवणूक चालू केली तर काय फायदा होतो, ते आता जाणून घेऊया.
अमनने जी चूक केली, तशीच चूक आपल्यापैकी अनेक लोकं करतात. विशेषतः तरुण मुलांचा ब्रँडेड कपडे, ऍक्सेसरीज, दर आठवड्याला पार्टी, मॉलमध्ये नियमित शॉपिंग अश्या गोष्टींकडे कल असतो. आपण एकदाच जगणार आहोत, मग पैशाची बचत करून काय फायदा. त्यापेक्षा, भरपूर खर्च करा, फिरा, पार्टी करा, शॉपिंग करा आणि आयुष्याचा आनंद घ्या अशी तरुणांची मानसिकता असते. विशेष म्हणजे आपण इ-कॉमर्स साईट्सवर किती खर्च करतोय, हे आपल्यालाच माहित नसतं.
जवळचा मित्र असो किंवा नातेवाईक, कोणत्याही लोनसाठी गॅरंटर म्हणून सही करताना आपण नक्की कोणती जवाबदारी घेतोय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. जर कर्जदाराने कर्जाचे हफ्ते वेळेवर भरले नाहीतर बँक गॅरंटरकडून सगळे पैसे वसूल करते. कर्जदाराला कर्जाची परतफेड करता आली नाहीतर बाकीचे सगळे EMI गॅरंटरला भरावे लागतात.
महागाई हा ज्येष्ठ नागरिकांचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्यांना पुरेशी पेन्शन मिळतिये, त्यांना महागाईची झालं बसलं नाही, कारण त्यांचा महागाई भत्ता वाढत जातो. त्यामुळे, महागाई वाढली तर त्याचं प्रमाणात त्यांची पेन्शन वाढते. मात्र, ज्या ज्येष्ठ नागरिकांचा खर्च FD च्या व्याजावर चालू आहे, ते महागाईमुळे अडचणीत सापडतात. सुरुवातीला उत्पन्न आणि खर्चाचं गणित जमतं, मात्र कालांतराने महागाई वाढत जाते पण FD चं व्याज आहे तेवढंच राहतं किंवा ते कमीदेखील होऊ शकतं.
लिक्विड ऍसेट्स असणारा करोडपती होण्यात खरी मजा आहे. मात्र, हे उद्दिष्ट साध्य करणं इतकं सोपं नाहीये. यासाठी फॉर्म्युला 12 15 20 आपल्याला उपयोगी पडेल. 1 कोटींचा लिक्विड पोर्टफोलिओ बनवण्यासाठी दर महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल, यावर किती % रिटर्न मिळेल आणि किती वर्षात हे उद्दिष्ट पूर्ण होईल. ते आता जाणून घेऊया.
आपल्याला जास्त रिटर्न तर हवा असतो मात्र जोखीम असल्यामुळे आपण मागे सरकतो. पण आता टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये, कारण आम्ही तुम्हाला नो लॉस स्ट्रॅटेजी सांगणार आहोत. हि स्ट्रॅटेजी वापरली तर अमरला म्युच्युअल फंड्स आणि शेअर्समध्ये गुंतवणूक तर करता येईलच पण महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला कॅपिटलवर एक रुपयादेखील लॉस होणार नाही. चला तर हि स्ट्रॅटेजी नक्की काय आहे ते जाणून घेऊया.
जयवंतच्या आर्थिक सल्लागाराने त्याला ह्युमन लाईफ व्हॅल्यू ही कन्सेप्ट समजून सांगितली होती. प्रत्येक आपली ह्युमन लाईफ व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ही कन्सेप्ट माहित नसेल, तर काळजी करू नका. पुढच्या 1 मिनिटात तुम्हाला ही कन्सेप्ट समजलेली असेल.
65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आता इंश्युरन्स कंपन्या नवीन प्लॅन लॉन्च करतील. सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे तुमच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये आता तुमच्या आई वडिलांचा समावेश करता येईल. त्यामुळे, घरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी पॉलिसी खरेदी करण्याची गरज राहणार नाही. IRDA ने हा महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे, मात्र ज्येष्ठ नागरिकांना या निर्णयाचा खरंच फायदा होईल का, ते जाणून घेणं महत्वाचं आहे.